Pages

Showing posts with label  Article. Show all posts
Showing posts with label  Article. Show all posts

Monday, 13 November 2017

त्रासाचे झाड

मामांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. मामांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत मामा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. मामांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा मामांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने मामांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी मामा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून मामा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. मामांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. मामांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. मामांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद ? मामांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन मामा  निघाले. भाचा मामांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता मामांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’ त्यावर भाचा म्हणाला, ‘‘मामा,  मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत. हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.

‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’

😊😊

यालाच जीवन म्हणतात.

एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.
पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.🐬🐬🐬
एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.

सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो...आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...

माणसाचं आयुष्य हे असंच असतं...त्याच्या हातात काहीच नसतं..आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...कर्ता करविता असतो तो ईश्वर...

एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...

"Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!"

आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...

कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...

"समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला"...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

"चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं"...

त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

"नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते."तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...

ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?कोण सांगेल? कोण सांगेल कोण??कुणीच नाही...हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!

मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..राजहंस मरताना सुद्धा गातो....

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

*यालाच जीवन म्हणतात.*

किती दिवसाचे आयुष्य असते?आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळूनकारण या जगात उद्या काय* होईलते कोणालाच माहित नसते...!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....
कोणाचा  अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....
-  तुम्ही खूप शक्तिशाली असाल,पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
- कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.....

Friday, 12 May 2017

*9 short stories worth reading* ..

1. *FALL and RISE*
Today, when I slipped on the wet tile floor a boy in a wheelchair caught me before I slammed my head on the ground.  He said, “Believe it or not, that’s almost exactly how I injured my back 3 years ago .

2. *A FATHER'S ADVICE*
Today, my father told me, “Just go for it and give it a try!  You don’t have to be a professional to build a successful product.  Amateurs started Google and Apple.  Professionals built the Titanic

3. *The POWER of UNIQUENESS* .
Today, I asked my mentor – a very successful business man in his 70’s – what his top 3 tips are for success.  He smiled and said, “Read something no one else is reading, think something no one else is thinking, and do something no one else is doing.

4. *LOOKING BACK*
Today, I interviewed my grandmother for part of a research paper I’m working on for my Psychology class.  When I asked her to define success in her own words, she said, “Success is when you look back at your life and the memories make you smile.

5. *TRY and YOU shall KNOW*
I am blind by birth. When I was 8 years old, I wanted to play baseball. I asked my father- "Dad, can I play baseball?" He said "You'll never know until you try." When I was a teenager, I asked him, - "Dad Can I become a surgeon?". He replied "Son, you'll never know until you try." Today I am a Surgeon, just because I tried!

6. *GOODNESS & GRATITUDE*
Today, after a 72 hour shift at the fire station, a woman ran up to me at the grocery store and gave me a hug.  When I tensed up, she realized I didn’t recognize her.  She let go with tears of joy in her eyes and the most sincere smile and said, “On 9-11-2001, you carried me out of world trade centre.
 
7. *LOOKING BACK*
Today, as my father, three brothers, and two sisters stood around my mother’s hospital bed, my mother uttered her last coherent words before she died. She simply said, “I feel so loved right now. We should have gotten together like this more often.”

8. *AFFECTION*
Today, I kissed my dad on the forehead as he passed away in a small hospital bed.  About 5 seconds after he passed, I realized it was the first time I had given him a kiss since I was a little boy.

9. *SHARING*
Today, I was traveling in Kenya and I met a refugee from Zimbabwe.  He said he hadn’t eaten anything in over 3 days and looked extremely skinny and unhealthy.  Then my friend offered him the rest of the sandwich he was eating.  The first thing the man said was, “We can share it.”

_Cheers to life_😊😊

Thursday, 11 May 2017

एक छानशी कथा

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो.

त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात.

ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात.

त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी चहूकडे भीरभीरत असते.

आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते.
एका म्हणीत म्हटलेल आहे की,

*"डुबत्याला काठीचा आधार"*

अगदी तसच होते, ते दोघेही जिवाच्या आकांतान त्या जीवरक्षक बोटीजवळ येतात.

परंतु त्यांची घोर निराशा होते.  त्यांना दिसत की, बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे.

पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो.

पत्नी बुडत्या बोटी वर थांबते.

बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगण्यांचा प्रयत्न करते.

शिक्षक गोष्ट सांगायचे थांबवतात.

*वर्गात निरव शांतता*

वर्गातील प्रत्तेक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होवून गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो.

अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्तेकालाच प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यात शिक्षक  वर्गातील मुलांना विचारतात की,

*पत्नी पतीला काय म्हणाली असेल?*

बहुतेक विद्यार्थी तर्क करुन सांगतात की, पत्नी पतीला म्हणाली असेल,

*'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही, तुम्ही स्वार्थी आहात..!'*

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपआपली मते मांडली. तेवढ्यात शिक्षकांचे एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाते.

एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, *"अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"*

तो मुलगा म्हणतो,

*"गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"*

शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"

तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, *"नाही गुरुजी, मला माहित नाही. पण; माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"

"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.

खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.

त्यातून असे समजते की, तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो.

आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.

त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, *"तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"*

ही गोष्ट आपल्याला सांगण्या मागचा एवढाच उद्देश की,  चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे, कधी कधी मोठी गुंतागुंत असते. जी आपल्या सहज लक्षात येत नाही.

त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.

*जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.*

*जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.*

*जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन...!*

🌹🌷🌹💞🌹🎈🌹🌺🌹

Wednesday, 28 September 2016

बेअरफुट

जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे -

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

१९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

Tuesday, 1 December 2015

🍀🌾 स्त्रिचा पदर 🌾🍀

Yesterday I came across one very interesting and heart touching message, I am just sharing with you all.

🍁  पदर  काय  जादुई  शब्द  आहे . . . . हो  मराठीतला ! 
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ. . .  तीन अक्षरी  शब्द.. .  पण  केवढं  विश्‍व  सामावलेलं  आहे त्यात....!!  किती  अर्थ,  किती  महत्त्व... काय  आहे  हा  पदर.......?

साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा भाग.......!! तो   स्त्रीच्या   लज्जेचं   रक्षण   तर करतोच,   सगळ्यात   महत्त्वाचं  हे कामच   त्याचं.   पण,   आणखी   ही बरीच  कर्तव्यं  पार  पाडत  असतो. या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा, कसा  अन्‌  कशासाठी  करेल, ते  सांगताच  येत  नाही. 

स्त्रि सौंदर्य   खुलवण्यासाठी   सुंदरसा पदर   असलेली    साडी   निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान पदरांची   जणू   स्पर्धाच लागलेली असते.  सगळ्या  जणींमध्ये  चर्चाही तीच. .....!!

लहान  मूल  आणि   आईचा  पदर, हे   अजब  नातं  आहे.  मूल  तान्हं असताना   आईच्या   पदराखाली जाऊन  अमृत   प्राशन  करण्याचा हक्क   बजावतं. .....!! जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ लागलं,  की  त्याचं  तोंड  पुसायला आई  पटकन  तिचा  पदर पुढे  करते . . .मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चालताना  आईच्या  पदराचाच  आधार लागतो.   एवढंच   काय,   जेवण  झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल ऐवजी  आईचा  पदरच  शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा वाटतात  मुलानं  पदराला  नाक  जरी पुसलं,  तरी  ती  रागावत  नाही ...त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन  लपायला आईचा पदरच  सापडतो.....!!

महाराष्ट्रात  तो  डाव्या  खांद्या  वरून मागे सोडला  जातो.....!!तर  गुजरात,  मध्य प्रदेशात  उजव्या खांद्यावरून पुढं  मोराच्या पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं चेहरा  झाकून  घेतात ..तर  काही  जणी  आपला   लटका ,राग     दर्शवण्यासाठी     मोठ्या फणकाऱ्यानं   पदरच   झटकतात ! सौभाग्यवतीची  ओटी  भरायची ती  पदरातच  अन्‌  संक्रांतीचं   वाण लुटायचं   ते  पदर   लावूनच.

बाहेर   जाताना   उन्हाची   दाहकता थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर ओढला  जातो,  तर  थंडीत  अंगभर पदर   लपेटल्यावरच   छान   ऊब मिळते....!! काही   गोष्टी   लक्षात   ठेवण्यासाठी पदरालाच   गाठ   बांधली   जाते .अन्‌   नव्या   नवरीच्या   जन्माची गाठ   ही   नवरीच्या   पदरालाच,नवरदेवाच्या   उपरण्यासोबतच बांधली   जाते.....!!

पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी  वापरला  जातो  ना.....?नवी  नवरी   नवऱ्याशी   बोलताना पदराशी  चाळे  करते, पण संसाराचा राडा  दिसला,  की  पदर कमरेला   खोचून   कामाला   लागते. देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?माझ्या   चुका  " पदरात "  घे.‘

मुलगी मोठी  झाली,  की  आई  तिला साडी   नेसायला   शिकवते,  पदर सावरायला   शिकवते   अन्‌   काय म्हणते  अगं,  चालताना  तू  पडलीस तरी  चालेल. ....!! पण,   " पदर "  पडू   देऊ   नकोस ! अशी  आपली  भारतीय  संस्कृती. अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा विनयभंग तर  दुरच्   ती. रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे   वर  नजर  करून  साधे पाहणार   ही   नाहीत   ऊलटे   तिला  वाट  देण्या साठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते त्या  "पदरात" ....... !

हा पदर जपण्याची . . . आणि तो तसाच टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आपण पूर्ण करुया.

Friday, 22 August 2014

---- श्रीमंत ---

लाख क्षण अपूरे पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी,
पण एक चुक पुष्कळ आहे ते दिशाहीन करण्यासाठी,
किती प्रयास घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी,
पण जरासा गर्व पुरा पडतो वरुन खाली गडगडण्यासाठी,

देवालाही दोष देतो आपण नवसाला पावण्यासाठी,
किती सराव करावा लागतो विजयश्री वर नाव कोरण्यासाठी,
....पण जरासा आळस कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरण्यासाठी,

किती तरी उत्तरं अपुरी पडतात आयुष्याचं गणित सुटण्यासाठी,
किती तरी अनुभवातनं जावं लागतं आयुष्य एक कोडं आहे हे पटण्यासाठी,
विश्वासाची ऊब द्यावी लागते नात्याला जीवनभर तारण्यासाठी,
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी 

कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!
मी आहे तरच सर्व आहे...,
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!

अरे वेड्या....! कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!

प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द
हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!


तर चला आपण सगळेच श्रीमंत होऊयात . . . . .  


Thursday, 10 July 2014

Virginity - A Question On Girls’ Morality

Reema: Name is used imaginary to hide identity of real person.

This incident usually happens in all the 'would be Marriage' houses some or by other way. . . Which I just don't understand why???So here I am raising my Voice. . .

This is when my well educated best friend Reema is decided to get married. . . . As per the Arrange marriage culture One  (so called educated and Rich) boy come to see her. . .

“Are you pure?” asked the guy who came to see my dear friend (Reema) for marriage.
 “Pure????” Reema couldn’t get his question.“Pure as in untouched?” he clarified. Reema now understood what he wanted to ask.
What are you looking for a girl to marry or ghee?” she replied agitated by such a question.
He was shocked at such a reply, but before he could say anything. Reema continued, “Well you can say if there was an exam about ‘purity’ I wouldn't top it!” His family left.

Next day he rang up Reema’s dad and told him that he cannot marry Reema as she is a girl with low
morals.Bang on!! Welcome to the progressive India where we claim to be modern people but still make Virginity a base to check a girl’s morals or her capability to become a good wife.

Today when we claim that women have an equal status in the society with that of men, we still are
under the orthodox views of using a white bed sheet on the first night of marriage just to check the bride’s virginity!!! The guy may himself have slept with number of girls but he wants a “pure”, “untouched” girl as a wife.

Why???

Answer-: Just to satisfy his male ego that the girl he is going to spend his life with has been and will be only his “possession”.If today a girl loses her virginity with a guy she loves truly but the guy turns out to be a cheat then she is tagged as a “slut”, “characterless girl” ; MIND YOU these being the most decent words I can pen down ,else there are a million more worse words in our mother tongue
vocabulary.

I ask what is the mistake of the girl? She loved a guy? She slept with someone she thought she
would marry? Or, she now has lost her purity which would satisfy her to-be husband’s male ego and make him believe that she is fit to be his wife! And again no answers I could get! I completely support the fact that we Indians should not give up on our morals and accept everything that westernization gives us but I wonder how can a biological wall in the girl’s body by breaking decide the level of her morals?

I mean Reema could have been a great wife, she was marrying the guy her parents chose, maybe she had a bad past… But all that was seen was that she wasn't pure! And I am forced to wonder that what
would happen to those rape victims? Who would marry those girls? Moreover a girl from a sports background, has always been told by those orthodox distant relatives to Quit it, why? because playing may result in breakage of the “moral wall”!! “ “Urggghhh ”, that’s what I have always thought after hearing that!!

Yes, I am also a girl, an Indian girl, who values her morals, for whom her “izzat” is priceless, who has always dream t of her “Raajkumar” coming on a white horse to marry her, and who has always planned her wedding dress! But I am also a girl who belongs to the globalized world, interacts with the opposite sex, loves, has break ups, overcomes them and smiles again and no one has a right to tag me any thing
for that reason! I just request you that next time you go looking for a girl for marriage, search for a true heart and not something like “pure ghee”, because she ‘s gonna be your life partner and not your meal to satisfy your hunger of ego.

When you look at a beautiful girl coming dressed in a red LEHENGA leaving her world behind, to become a part of your world, accept her, make her life a bed of roses rather than testing her loyalty by making her lay down on a bed with white bed sheet because true love will make your marriage successful, her “purity” won’t.

Share dis message if you respect it! Now most of you ll send it only to girls if you are a gal and vice versa .plz send it to all guys ..so we may awaken the world that a girl is not just doormat..but a being of substance. Its up to you. Don't judge the sender, that person is just making a step
forward to build a positive India.. So that we can proudly say 'India is Changing towards real growth'.

Reema: Name is used imaginary to hide identity of real person.

Tuesday, 4 March 2014

We Made our life so Busy. . . .

"Life is so Busy "

आज असच वाटत होत कि आपण आपल्या आई बद्दल काहीतरी लिहाव ,पण कुठून सुरवात करू?बरेच दिवस झाले तिच्याशी व्यवस्थित बोलता नाही आलंय.नेहमी रोजच phone करता येत होता. . . . काही नसल तरी तिचा आवाज ऐकता येत होता पण हल्ली फारच Busy झालीये मी. . . . .Busy झालीये कि मी स्वतःलाच " Busy आहे " अस म्हणउन घेतलय .

आईच काय पण घरातल्या कितीश्या व्यक्तींना मी Phone Call करते किवा बोलते???अस म्हणतात कि Relation जोडायचे असतात. आईनेपण माणस जोडायला शिकवलीयेत. . . माणस जोडलीयेत. . . . पण Relation खरच Maintain होतात का??किंबहुना मला माणस जपता येतात का?

हे माझ्याच बाबतीत आहे कि सगळेच "Busy" बनत चलियेत अगदी माझ्यासारखे? समोरचा "आपला" माणूस आपल्याकडून काहीतरी Expect करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवच नसते. . . ?अजूनही वेळ गेलेली नाहीये. . . आजपासूनच काय तर आत्तापासूनच जपलं पाहिजे नाहीतर फार उशीर होईल . . . .चला मग एक Phone Call करूयात. . .आपल्या माणसांना . . .मन जपण्यासाठी. . . .आपल्यासाठी. . . स्वतःसाठी

आयुष्य इतक Busy नाहीये जेवढ आपण त्याला बनवलय . . .